- Advertisement -
ठाणे शहरातून मुंबईला जाणाऱ्या कोपरी पुलाला वापर करण्या आधीच तडे गेले आहेत. ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी निदर्शनास आणुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज मनसेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या कोपरी पुलावर टाळ मृदुंग वाजवुन आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे पोलिसांनी मनसेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
- Advertisement -