- Advertisement -
विठ्ठलवाडी, उल्हासनगर या स्थानकांवरून प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये बसून अंबरनाथपर्यंत येतात आणि त्याच ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जातात. त्यामुळे या ट्रेन सकाळी अंबरनाथ स्थानकावर येतानाच भरून येत असल्यामुळे अंबरनाथकरांना ट्रेनमध्ये चढायला जागाच मिळत नाही, असा दावा करत बुधवारी सकाळी मनसेने अंबरनाथ स्थानकावर जोरदार आंदोलन केलं. मात्र, आंदोलक ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
- Advertisement -