- Advertisement -
देशात कोळशाच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील कोळशाच्या उपलब्धततेचा आणि विजेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पण या बैठकीनंतरही कोणतेही नवे आदेश जाहीर करण्यात आले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ऊर्जामंत्री आरके सिंह आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात कोळशाचे संकट आणि विजेची उपलब्धतता या विषयावर सविस्तरपणे चर्चा झाली.
- Advertisement -