- Advertisement -
उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजप सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. केंद्र सरकारवर अशी घणाघाती टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे. असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.
- Advertisement -