- Advertisement -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामांतराच्या वाद आता उफाळून आला आहे. अशातच स्थानिक पातळीवर दि बा पाटील यांचे नाव या प्रकल्पाला मिळावे यासाठीची भूमिपूत्रांची मागणी जोर धरत आहे. अद्यापही सिडकोमार्फत अनेक गावातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नामांतराचा विषय सरकारने रेटून नेल्यास यापुढच्या काळात प्रकल्पाचे काम रोखण्याचाही इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळेच नवी मुंबई एअरपोर्टच्या कामावर येत्या काळात होण्याची शक्यता आहे. एकुणच या नामांतराच्या विषयामुळे प्रकल्पाची डेडलाईन पुढे जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
- Advertisement -