- Advertisement -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा बुधवारी पार पडला. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव व आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात, विचारांचे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले, ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात, तर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडलं आहे. कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते, अशी खिल्ली नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंची उडवली
- Advertisement -