- Advertisement -
पंतप्रधान मोदींनी संसदेत काँग्रेसने कोरोना पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, असं म्हणत हीच आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं सांगितलं. यामुळे आता महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित आहे.
- Advertisement -