- Advertisement -
रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या. पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेते यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. ज्यापध्दतीने त्या त्यांची ट्रान्स्फर झालेली सांगत आहेत मात्र त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
- Advertisement -