- Advertisement -
राज्यातले विरोधक वारंवार सरकार पडणार अशी वक्तव्ये करत असले तरी त्यात तथ्य नाही. मुळात प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आपला प्रभाव राहावा, म्हणून ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. इगतपुरी येथील भावली आणि वैतरणा धरण येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीते आले होते. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे, इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.
- Advertisement -