- Advertisement -
१३ व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि संसदिय कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. ‘आव्हाड यांचे हे शेवटचे अधिवेशन आहे’ अशी शाब्दिक कोटी तावडे यांनी केल्यानंतर आव्हाड यांनी तावडेंना मुंब्रा-कळवा मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते. ७५ हजार मतांनी पराभव केला नाही, तर बापाचे नाव सांगणार नाही, असे चॅलेंजच आव्हाडांनी दिले होते. योगायोग असा की यावेळी तावडे जरी निवडणुकीला उभे राहिले नसले तरी जितेंद्र आव्हाड यांनी ७५,६०० मताधिक्य घेऊन हे चॅलेंज पुर्ण केले आहे.
- Advertisement -