- Advertisement -
आमदार नितेश राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली .याच दरम्यान माध्यमांशी संपर्क साधात नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू सणांवर निर्बंध लावून त्यांचे महत्व कमी करण्याचे काम ठाकरे सरकार करत आहेत. मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला संपवण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. तसेच त्यांनी होर्डींगवर सुद्धा बंदी घातली आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान लावण्यात येणाऱ्या होर्डींगमुळे कोरोना कसा पसरू शकतो? असा सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
- Advertisement -