- Advertisement -
महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार? हा प्रश्न आता देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ‘राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते’, असे वक्तव्य केले होते. गडकरींच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय नेत्यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींच्या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.
- Advertisement -