- Advertisement -
संपूर्ण जगभरात ओमिक्रॉनमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले होते. मात्र आता महाराष्ट्रातील ३२ ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी २५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक माहिती गुरुवारी समोर आली. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात ७ ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईकरांसाठी देखील दिलासादायक बाब म्हणजे १४ ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी १३ रुग्ण बरे झाले आहेत.
- Advertisement -