- Advertisement -
भंडारा जिल्ह्यात एक क्विंटलदेखील धान खरेदी झालेली नाही. मागील हंगामाची सुद्धा धान खरेदी पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांना धानाचे पैसे, बोनस अद्यापही मिळालेले नाही. जिल्ह्यात मोठया प्रमाणात धान घोटाळा झाला आहे. काही नेत्यांच्या दबावाखाली जिल्ह्यात धान खरेदी केंद सुरू करण्यात आले असून हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. बाहेरील राज्यातील धान आणून शासनाला दाखवायचा आणि जिल्ह्यातील धान बाहेर विकायचा असा गोरखधंदा सध्या सुरू आहे.
- Advertisement -