- Advertisement -
होमगार्डचे महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हे कोणाचीही परवानगी न घेता मुंबईतून परदेशात पळून गेल्याचा सर्वांचा संशय आहे. एक महासंचालक दर्जाचा अधिकारी देशाबाहेर जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परमबीर सिंह यांनी गृहमंत्री म्हणून माझी किंवा राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची परवनागी घेतली नाही, असे धक्कादायक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी केले आहे.
- Advertisement -