- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूमद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रारी नाही तर महत्त्वाच्या आठ सूचना दिल्या. त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे घेण्यात आले. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाची सूचना केली आहे. ‘विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करा’, अशी सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
- Advertisement -