- Advertisement -
कोरोना महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला परिणामी शहरातून रोजगार नसल्याने मोठया प्रमाणावर तरूणाई आपल्या मुळ गावी परतली त्यातील काही शेतीकडे वळले. अशांपैकी एक पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावचा तरुण नोकरी गमवल्यामुळे गावी आला.त्याने वडीलोपार्जित शेती पारंपारीक पद्धतीने न करता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसे होता येईल याचा अभ्यास करून अननस फळाची आपल्या शेतात लागवड केली. कोकणात प्रामुख्याने पोलादपूर तालुक्यात प्रथमच अननस फळ लागवड करून त्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
- Advertisement -