- Advertisement -
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडत असताना राज्यातही राम मंदिर तसेच रामाच्या प्रतिमेची पूजा, आरती करण्यात आली. नाशिकमध्ये राम भक्तांनी जल्लोष करत हा आनंद साजरा केला. यावेळी नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने जल्लोष करण्यास मज्जाव केल्याचा आदेश दिला असून त्यावर ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. ही आता पहिल्या सारखी सेना राहिलेली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
- Advertisement -