- Advertisement -
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा गुरुवारी (11 मे) निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांची भेट घेतली. तसेच, या भेटीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आणि ठाकरे गटाचे पत्र दिले. या घडामोडीवर परदेशातून मायदेशी परतलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
- Advertisement -