- Advertisement -
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला यासह भोग्यासंदर्भात देखील भाष्य केलं. दरम्यान राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर औरंगाबाद पोलिस तसेच गृहखाते देखील सतर्क झाले आहेत. राज्यातील मनसे जिल्हाध्यक्षांसह 15 हजार मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यासह राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर पहिल्यांदा हनुमान चालिसा लावलेल्या महेंद्र भानुशाली यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे
- Advertisement -