- Advertisement -
कसबा पेठ आणि चिंचवड येथे होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदाराच्या घरातील उमेदवार उभे राहणार असतील तर त्याजागी बिनविरोध निवडणूक करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, असा राज ठाकरेंचा पत्राचा आशय आहे. तथापि, पत्रातील एका विधानावरून, राज ठाकरेंनी बिनविरोधासाठी केलेली मागणी केवळ चिंचवडसाठी असून कसब्यासाठी नाही आणि याठिकाणाहून मनसेही उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
- Advertisement -