- Advertisement -
अपमान करणारी काँग्रेस एका बाजूला आणि सन्मान करणारी शिवसेना-भाजप एका बाजूला, असे म्हणत सावरकरांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी काँग्रेससह सावरकर विरोधकांवर टीका केली. सावरकरांना भारतरत्न मिळाल्यास सावरकरांचा आजवर झालेल्या अवमानाची थोडीफार भरपाई होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या चपला या लोकांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातल्या त्याच चपला आता लोक काँग्रेसला आणि सावरकर विरोधकांना घालतील, अशी टीका देखील त्यांनी केली.
- Advertisement -