- Advertisement -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवील सावरकर यांच्यावर वादग्रस्त टीका केली आणि देशभरातील वातावरण ढवळून निघाले. भाजपला या प्रकरणावरुन महाराष्ट्रात शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी गवसली आहे. तर काँग्रेसला आपले सरकार टिकवण्याची कसरत करावी लागणार आहे. मात्र या सर्व राजकारणात सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांना काय वाटते याबाबत माय महानगरने त्यांच्याशी बातचीत केली.
- Advertisement -