- Advertisement -
एसटी महामंडळाच्या संपाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांचा आकडा १०० च्यावर गेला आहे. त्यामुळे सरकारला एसटीच्या प्रश्नाचं गांभीर्य आहे का?, असा सवाल विधानपरिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून विलीनीकरणाच्या मागणीबाबत त्यांनी वक्तव्य केलं. एसटीचा तिढा कधी सुटणार, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
- Advertisement -