- Advertisement -
नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने टीएमसीचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा, सुब्रत मुखर्जी आणि सोवन चॅटर्जी यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले. त्यानंतर सीबीआयने मंत्री हकीम यांच्यासह चार टीएमसी नेत्यांना अटक केली आहे. नारदा घोटाळ्याची आधीही चौकशी सुरु होती. मग त्यावेळी का अटक केली नाही. काल शपथ घेतली आणि आज अटक. हे राजकारण आता थांबवा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
- Advertisement -