- Advertisement -
अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहराला भेट दिली. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अमरावतीसारख्या घटना घडू नयेत म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये, असा टोला राऊतांनी लगावला. इथे ठाकरे सरकार आहे. कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्र होते. महाराष्ट्रामध्ये अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता ती शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला.
- Advertisement -