- Advertisement -
आज एक धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची जी अवस्था आहे, या देशाला विज्ञाननिष्ठेच्या दिशेने नेण्याचे काम पंडित नेहरूंनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता, याबद्दल देश नेहरूंचा ऋणी आहे, असंही राऊत म्हणाले. कोणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केला म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. ही आपली परंपरा नाही, आम्ही सर्व सावरकरांचे भक्त आहोत. त्यांच्यासाठी इथे लढाई आणि वकिली करतोय, अशा शब्दांत शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रणजित सावरकरांना खडेबोल सुनावलेत.
#sanjayraut #sanjayrautnews #sanjayrautspeech #sanjayrautdaughterwedding #sanjayrautuddhavthackerayinterview #sanjayrautinterview #sanjayrautstatus
- Advertisement -