- Advertisement -
पतंजलीचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात, अशात पुन्हा एकदा त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. पतंजलीच्या मोफत शिबीरात बोलताना बाबा रामदेव यांनी ‘महिला साडीत छान दिसतात, सलवार सुटमध्येही छान दिसतात, आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही कपडे घातले नाही तरी छानचं दिसतात’ असं विधान केले. त्यांच्या या विधानावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सवाल केला आहे. तसेच भाजप नेत्यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांवरून शिंदे फडणवीस सरकारने आपली जीभ दिल्लीला गहाण ठेवली का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
- Advertisement -