- Advertisement -
सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था कायदा आणि घटना त्यावर विश्वास ठेऊनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलो आहोत. ज्याप्रकारे या राज्यामध्ये शिंदे गट-भाजप असं बेकायदेशीर सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यासाठी राजभवनाचा वापर करण्यात आला आहे. विधीमंडळाचा वापर करण्यात आला. या सगळ्या अन्यायाविरोधात शिवसेना महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही खिशात असू शकत नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
- Advertisement -