- Advertisement -
संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हटलं होतं, त्यालाच आता छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय. ड्राफ्ट साईजमध्ये तो कच्चा मसुदा होता, तो फायनल झालेला नव्हता, फायनल झाला असता आणि मग त्यांनी विचार बदलला असता, तर म्हणता येईल शब्द फिरवला, यू-टर्न मारला. पण आता तसं म्हणता येत नाही. वाटाघाटी चालू असताना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते ड्राफ्टमध्ये होते. नक्की काही ठरलेलं नव्हतं, जोपर्यंत शिक्कामोर्तब आणि सह्या होत नाहीत तोपर्यंत काही पक्कं नाही. ड्राफ्ट शब्द वापरला गेला म्हणजे ते कच्च होतं, असं श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले आहेत.
- Advertisement -