- Advertisement -
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. राज्यपाल सतत महाराजांविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी, सावित्रीबाई फुलेंविषयी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य करतात ते दिल्लीच्या बादशाहांच्या इशाऱ्यांवर करतात की काय, असे वाटत असल्याचे अंबादास दानवे म्हणालेत. दानवेंनी राज्यपालांवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
- Advertisement -