- Advertisement -
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबर २०२१ पासून संप पुकारला आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार पगार करण्यात यावा, अशी मागणी आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक पगारवाढ केली आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करणं शक्य नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी शेवटचे अल्टिमेटम देण्यात आले होते. आता कठोर कारवाई करण्यास राज्य सरकार सुरुवात करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.
- Advertisement -