- Advertisement -
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण करा अशी मागणी त्यांनी जोर लावून धरली आहे.दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार घेत असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र राज्य सरकारने घेतलेला निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. यामुळे एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत.
- Advertisement -