- Advertisement -
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. यामुळे अजून तरी पुढील काही दिवस गप गुमान घरात बसून काढावे लागणार आहेत. यामुळे कंटाळेली जनता आणखीनच वैतागली आहे. पण घरात बसण्याचा कंटाळा करू नका. घरच्याच क्रिझवर राहा. कारण क्रिझ सोडून गेलात तर कोरोना आपल्याला आयुष्यातूनच आऊट करेल. म्हणून पंतप्रधान नरे्ंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे सांगत आहेत ते ऐका. घऱातच राहून या कोरोनाची विकेट काढूया. असे आवाहन नालासोपाऱ्यात राहणाऱ्या समर्थ राजेश पाचुणकर या छोट्या मित्राने केलं आहे.
- Advertisement -