- Advertisement -
मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर झालेला आज सकाळी जीवघेणा हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच काल अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचे दिवसाढवळ्या झालेली मारामारी आणि त्यात गंभीर जखमी झालेले जिल्हाप्रमुख हे सगळे ज्या पद्धतीने घडत आहे, यावरून एकूणच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पकड ढिली होत आहे का, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -