- Advertisement -
गेल्या सात महिन्यापासून अविरतपणे सेवा पुरवणारे एसटी कर्मचार्यांना पगार न दिल्यामुळे एसटी कर्मचारी रडकुंडीला आले आहेत. दिवाळी सण तोंडावर आला असताना एसटी कर्मचार्यांचा हातात एकही दमडी पडलेली नाही. त्यातच या आर्थिक घुसमटीला कंटाळून रत्नागिरी आणि जळगावच्या एसटी कंडक्टराने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. दोन जीव गमावल्यानंतर एसटी महामंडळाला आता जाग आली आहे. सोमवारी दुपारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी थकीत वेतन देण्याची घोषणा केली. त्यामुळे या आत्महत्येला ‘ठाकरे’ सरकारच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
- Advertisement -