- Advertisement -
या वर्षातील शेवटचे कंकणाकृती सुर्यग्रहण गुरूवारी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी संपूर्ण भारताला अनुभवायला मिळालं. ५८ वर्षानंतरचे हे पहिलेच सर्वात मोठे सूर्यग्रहण होते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने या सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. नाशिककर आणि भाविकांनी रामकुंडावर जाऊन सूर्यग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान केले. दान- धर्म केला. पण, आजही सूर्यग्रहण या शब्दामागे अनेक अंधश्रद्धा आहेत. ज्या आता मागे टाकल्या पाहिजे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.
- Advertisement -