- Advertisement -
कोरोनामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत. वाहतुकही बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. डोळ्यासमोर आलं पीक झाडावर सडताना बघण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. ते पीक काढून टाकण्यापलीकडे शेतकऱ्याकडे आता पर्यायच उरलेला नाहीये. बाभळेश्वर येथील शेतकरी शरद महादू टिळे यांनी गट नंबर २५४ मधील सोनाका प्रकारचा एक एकर द्राक्षे विकत घेण्यासाठी कोणीही व्यापारी धजावत नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी द्राक्षांसह बागातील झाडे बुंध्यापासून तोडून टाकली आहे.
- Advertisement -