- Advertisement -
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांवा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. परंतु त्यांना राज्य सरकारकडून झेड प्लस सुरक्षा का दिली नाही? याबाबत आम्हाला काही कळले नाही, असे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि आमदार उदय सामंत म्हणाले.
- Advertisement -