- Advertisement -
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधलेल्या राखीच्या घटनेचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं आहे. ताईंना धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईवरून दलाल इकडे पाठवले जायचे. ताईंच्या चेलेचपाट्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार. ताईंनी काय केलं, तर थेट पंतप्रधानांना राखी बांधली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं आहे.
- Advertisement -