- Advertisement -
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी प्रवासीसेवा मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वंदे भारत हा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. भारतात वंदे भारत एक्स्प्रेसचा डंका वाजत असून १०हून अधिक अत्याधुनिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस – सोलापूर आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस – शिर्डी यानंतर आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव (गोवा) अशी रेल्वेसेवा कोकणवासीयांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
- Advertisement -