- Advertisement -
पावसाळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाचे नगर परिषद प्रशासनाला नालेसफाईचे आणि साचलेल्या गटारी सफाई करण्याचे आदेश असून सुद्धा भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील नाल्यामध्ये तुंबलेले गटार आणि झाडेझुडपे यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा घाणीमुळे पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून याबाबतीत स्थानिक नागरिकांची प्रशासनाला वारंवार सूचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यामुळे साथीच्या रोगाची लागण झाली तर याला जबाबदार कोण?, असा नागरिकांमधून प्रश्न निर्माण झाला आहे. यावर वरणगाव नगरपरिषदेने तात्काळ दखल घेऊन नालेसफाई करावी आणि झाडेझुडपे तोडून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
- Advertisement -