- Advertisement -
मागील सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यावेळी या जुन्या पेन्शनबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांची संपातून माघार घेतल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली आहे.
- Advertisement -