- Advertisement -
एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देश हैराण झाला आहे. तर आता दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस होत असल्याने बरेच परिसर जलमय झाले आहेत. तर नायर रुग्णालया बाहेरील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या रुग्णालयता ये-जा करणाऱ्या रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
- Advertisement -