- Advertisement -
ऐरोली येथून औरंगाबाद येथे प्रवाशांना घेऊन निघालेल्या खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने मुलुंड पूर्व टोल नाका येथे बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ ते ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून बसमध्ये एकूण २६ प्रवाशी प्रवास करीत होते. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
- Advertisement -