- Advertisement -
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवशीय अमेरिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या शेवटी पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करणार आहे. मात्र यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी पकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे. जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाच्या मंचावरून भारताने जम्मू काश्मीर आणि लदाख भारताचा अविभाज्य भाग आहे. असे पाकिस्तानला खडसावून सांगितले.
- Advertisement -