- Advertisement -
मे महिना सुरू झाला की गावाखेड्यात पाण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू होते. नाशिक जिल्ह्यातील इगतपूर तालुक्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत आहे. महिला, पुरूष, मुली सगळेच जीव धोक्यात घालून कधी रेल्वेचा भोगदा पार करून तर कधी रेल्वे रुळ ओलांडून दूरवरून पाणी घेऊन येत आहेत. भर उन्हात पाण्यासाठी गावकऱ्यांना ही पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात हे दृश्य दरवर्षी पाहायला मिळते.
- Advertisement -