- Advertisement -
राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन १ महिना होत आला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ स्थापन करण्याची यांची हिंमत झाली नाही. महाराष्ट्र बेवारस पडला आहे. मुख्यमंत्री दिल्लीदौरा करत आहेत. अजून त्यांना निर्णय घेता आलेला नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेतं. तसेच काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसले.
- Advertisement -