घरमहाराष्ट्र'राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी'

‘राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी’

Subscribe

भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची देखील मलिक यांनी महिती दिली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमाप्रमाणे राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिलं आहे. याचं पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मत व्यक्त केलं आहे. ‘राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी’, असं नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल

पुढे ते असं म्हणाले की, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलं आहे. जी प्रक्रिया आता सुरू झाली ती अगोदर होऊ शकत होती. घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिलं पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलं आणि पटलावर सरकार पडलं तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -