घरमुंबईजनतेने सत्तेचा माज उतरवला - सचिन सावंत

जनतेने सत्तेचा माज उतरवला – सचिन सावंत

Subscribe

जनतेने सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा माज उतरवला असून विरोधी पक्ष दिसत नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अधिक ताकदवर विरोधी पक्षाचे दर्शन घडवून दिले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालातून जनतेने सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा माज उतरवला असून विरोधी पक्ष दिसत नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अधिक ताकदवर विरोधी पक्षाचे दर्शन घडवून दिले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीमध्ये महायुतीच्या १६० तर महाआघाडीला ९९ जागा मिळाल्याचे समोर आले आहे. महाआघाडीने विजयाचा गाठलेला आकडा बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आपलाच विजय होईल म्हणत गाफील राहिलेल्या शिवसेने आणि भाजपला मोठा धक्का लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी टीका केली आहे.


हेही वाचा – खडसेंच्या कन्येचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील आहेत तरी कोण?

- Advertisement -

 

नेमके काय म्हणाले सचिन सावंत?

सचिन सावंत म्हणाले की, ‘गेली ५ वर्ष सातत्याने विविध निवडणुकांमध्ये एकतर्फी निर्णय येत होता. परंतु हा निकाल पुन्हा उभारी देणारा आणि भाजप शिवसेनेच्या हुकुमशाही विरोधात संघर्ष करण्याकरिता ऊर्जा देणारा आहे. गेली पाच वर्ष सातत्याने सत्ताधाऱ्यांनी लोकशाही विरोधी भूमिका घेऊन राज्य केले आहे. साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याकरिता यंत्रणांचा वापर आणि विरोधी पक्ष फोडण्याकरिता सर्व अनैतिक मार्गांचा उपयोग या सरकारने केला. सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये राज्यातील मुलभूत प्रश्नांना बगल देण्याकरिता स्वतःचे मुद्दे लादले हे जनतेला आवडलेले नाही. जनतेच्या विरोधातही दडपशाहीचा मार्ग या सरकारने स्वीकारला होता, हे आरे कॉलनी असेल वा अन्य ठिकाणी पहायला मिळाले. एके ठिकाणी प्रचंड आक्रोश असताना सत्ताधाऱ्यांची वक्तव्ये ही अहंगंड दर्शवणारी होती. जनतेने हा अहंकार मोडून काढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजकारण हे भाजपला मदत करणारे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही मतांपासून कायम वंचीत होईल हेही या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. जनतेला गृहीत धरू नये हा संदेश सत्ताधाऱ्यांना जनतेने दिला असून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनोबल वाढवणारी ही जनतेची मन की बात आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – अखेर मनसेचा गुलाल उधळला; कल्याणचे राजू पाटील विजयी


 

काँग्रेसची विचारधारा पुन्हा मजबूत होत आहे – सावंत

‘या निवडणुकीतून स्वतःच्या स्वार्थाकरिता पक्ष आणि विचारधारेंचा त्याग करणाऱ्यांना देखील जनतेने धडा शिकवला आहे. अनेक मंत्री तर पडलेच यातून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठ्या प्रमाणात होता हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या यशाचा काँग्रेस पक्षाला आनंद आहे आणि काँग्रेसची विचारधारा पुन्हा मजबूत होत आहे याचे समाधान आहे. या पुढील काळात काँग्रेस समविचारी पक्षांच्या मदतीने भाजपच्या अनैतिक आणि हुकुमशाही मानसिकतेचा निकराने विरोध करत राहील’, असे सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -